Skip to main content

Posts

Showing posts from November, 2019

घडी....

"अगं नीट घाल न घडी. लक्ष कुठे आहे तुझं? तो बघ मधला शेव सुटलाय ", आईच्या बोलण्याने भानावर आलेल्या तिने हातातल्या पैठणीकडे पाहिलं. खरंच की मधला शेव सुटलाय. "असंच होतं माझ्यासोबत", तिने मनाशीच विचार केला. कसलीही घडी घालताना बसवताना मधला शेव सुटतोच आणि बिनसतं सारं. खरच अशी सुरेख काठावर काठ आलेली घडी बघितली की मन कसं तृप्त होतं. अनेक घड्या पडलेलं आयुष्य उलगडत तिच्याशी बोलणारी तिची आई तिला कळकळीने सांगत होती जेणेकरून तिची उस्कटलेली घडी परत नीट बसावी. घडी पांघरुणाची, साडीची, कपड्यांची आणि कशाकशाची. नीट सारी टोकं जुळली की सुरेख मेळ जमतो आणि परफेक्ट घडी बसते. दुपट्याच्या घडीपासून झालेली सुरुवात मासिक पाळीच्या घडीपाशी आली आणि तिचं आयुष्य वेगळ्या वळणावर वाहू लागलं. अनेक बंधनं आली आणि घड्या पडल्या मनाला. घड्या घालून बंद केले कप्पे आणि हाताची घडी करून वाट चालू लागली. अशाच अनेक घड्या घालत घालत साडीने तिच्या आयुष्यात पायघड्या घातल्या. साडी नेसतो तेव्हा तिलाही अनेक घड्या घालाव्या लागतातच फक्त त्यांना प्रेमाने आपण ' निऱ्या ' म्हणतो. तर अशा ह्या सुरेख निऱ्या तिला सोबत ...

देव....

केवढा गहन विषय! बरेचदा आपण अनेकांना बोलताना ऐकतो, " मानला तर देव नाहीतर दगड" किंवा " ह्या देवबिव काही नाही , सगळं काही आपल्यावर अवलंबून आहे" वगैरे ....                   ‎पण आज मी देवावर बोलणारे(लिहिणारे). देव आहे की नाही? तो दिसतो की नाही? यापेक्षा मला वाटतं की तो आहे ही धारणाच खूप काही करून जाते.                   ‎अनेकांचं मला माहित नाही पण माझ्या बाबतीत तरी हे 100% खरं आहे. अनेक प्रसंगात "देव आहे" ,  " त्याच्यावर सोडून देऊयात" ," तो सगळं ठीक करेल " इत्यादी विधाने मानवी मनाला रिलॅक्स करतात.                   ‎निर्गुणाची कल्पना जनसामान्यांना येणं कठीण म्हणूनच सगुण अवतारातील देव! आणि पहा ना आपल्यासारखाच हात पाय डोळे असणारा, आवडी निवडी असणारा, रागावणारा, प्रसन्न होणारा असा देव आपल्यातीलच एक असा नाही का वाटत?  उगाचच आपलं ' supernatural power'  वगैरे म्हटलं की कसं 'detached' झाल्यासारखं वाटतं.... याउलट देव! असं नुसतं म्हटलं तरी कसं 'अहाह...

मन आणि मनांतरे...

व्यक्ती तितक्या प्रकृती अशी म्हण आहे आपल्या मराठीत. प्रसंग एकच पण त्याविषयी मनात उमटणाऱ्या भावना या माणसागणिक बदलतात....          अनेक घटना आपण आठवून पहा. एका अंगाने तिच्याकडे पाहता ती आनंददायी, यशस्वी अशी वाटते तर तिच घटना दुसऱ्या अंगाने अगदी विरुद्ध भावना उत्पन्न करते. म्हणूनच म्हणतात की संकटकाळीच खऱ्या मित्राची परीक्षा होते. " सुख के सब साथी, दुःखमे न कोई " असं उगाच का गायलंय!          सुखाच्या, आनंदाच्या, यशाच्या, मिळकतीच्या क्षणी अनेक जण जवळ येतात. वाहवा करतात, अगदी गुळाला मुंगळे चिकटावेत तसे. तसंच या यशात वाटेकरी होणारेही असतात. हे  यश आमच्यामुळेच कसे मिळाले हे वाढवून फुगवून सांगणारेही असतात.          आणि अगदी त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला जो अयशस्वी किंवा पराजित झालेला आहे त्याच्या भोवती सुद्धा मुंगळे असतातच पण ते डंख मारतात. द्वेषाचे विष कालवतात मनात.          अनेक वेळा आपले कौतुक करणारी व्यक्ती ही आपली आप्त, मैत्र आहे की केवळ जिभेवर साखर आणि मनात हलाहल असलेली आहे हे ओळखणे...