Skip to main content

Posts

Showing posts from October, 2019

आनंद लुटूया....

गेल्याच आठवड्यात मकरसंक्रांत होऊन गेली. आता रथसप्तमीपर्यंत हळदीकुंकवाचे समारंभ सुरू राहतील. आपल्या संस्कृतीत समारंभांना विशेष महत्व आहे. प्रत्येक सणाला धरून समारंभ असतोच. हे सगळे समारंभ आपल्याला एकत्र आणतात, संवाद वाढवतात (काही वेळा वादही), आपुलकी माणुसकी समृद्ध करतात.                        संक्रांतीच्या निमित्ताने होणाऱ्या तिळगुळ आणि हळदीकुंकू समारंभाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात लुटणाऱ्या वस्तू. महाराष्ट्रात सर्वत्रच बहुदा हा सण थोड्या फार फरकाने असाच साजरा करतात. नवविवाहित स्त्रीच्या विवाहापासूनच्या पहिल्या 5 वर्षात काय वस्तू लुटाव्यात याबद्दल काही अलिखित नियम आहेत. त्यानंतर काहीही लुटावे आपल्याला हवे ते.                        "अहो यंदा काय देऊ सगळ्या बायकांना संक्रांतीचे वाण म्हणून?" यावर अहोंचे उत्तर, "माझा मोबाईल नंबर दे" हे असले पांचट जोक्स सोशल साईट्स वर मुबलक फिरू लागतात संक्रांत जवळ आली की. काय तर म्हणे माझा नंबर दे! किती चुकीचा संदेश जातो या जोकमधून याचा को...

मैत्री...

  आज ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार. आज मैत्री दिन साजरा करतात म्हणे! हे मला हल्लीच कळलंय म्हणा.           मैत्री कोणाशी करावी की जुळावी याचा असा काही ठोक फॉर्म्युला नाही. एखाद्याशी पटलं जमलं की आपोआप जुळते मैत्री!           पक्के मित्र, जिगरी यार वगैरे संज्ञा या मैत्रीला दिल्या जातात. कृष्ण-सुदामा ही मैत्रीची फेमस जोडी. रंग रूप भाषा जात धर्म लिंग आर्थिक स्थिती काहीही मैत्रीच्या आड येत नाही. ज्याच्याशी wave length जुळली त्याच्याशी मैत्रीचे बंध घट्ट बांधले जातात.           असं म्हणतात की मित्राला आपण न सांगताच नुसतं पाहून आपल्या मनातील भावना कळतात. काही पठ्ठे तर नुसत्या आवाजाच्या टोन वरून सांगतात काही जण तर कधीकधी सायलेन्स पण ऐकतात आणि म्हणतात " बिनसलंय का काही आज तुझं?" असे हे मित्र!           जीवाभावाचे, गरजेला धावून येणारे, निर्हेतुक प्रेम करणारे, रडायला खांदा देणारे, ऐकायला कान देणारे, सावरणारे, समजून घेणारे, समजूत घालणारे, रागावणारे, हसवणारे, असे हे मित्र आपल्या आयुष्यात रक्त...

चिमणा नसलेलं घरटं....

एका जंगलात एक मोठा वृक्ष होता. खूप जुना एखाद्या ध्यानस्थ ऋषीसारखा तो जंगलाच्या मधोमध उभा होता. निश्चल, अभेद्य, पुराण आणि खंबीर. अनेक घरटी त्याच्या अंगाखांद्यावर होती. त्या घरट्यांतूनअनेक संसार अगदी सुरळीतपणे सुरू होते. चिमणा चिमणी आपला संसार काडी काडी करून जोडत होते. सगळे जण एकमेकांसोबत गुण्या गोविंदाने नांदत होते.                               प्रत्येकाचा संसार सुरू होता. कोणाला कमी तर कोणाला जास्त असं काही ना काही पदरात पडतच होतं आणि त्यात ती सर्व मंडळी खुश होती. चिमणा चिमणी दोघेही आपल्या आपल्या परीने आपलं घरटं सजवण्याचा, सावरण्याचा, वाढवण्याचा प्रयत्न करीत होते. झालंच तर अगदी शेजाऱ्याला पण मदत करत होते, मदत मागत होते. सगळं कसं अगदी सुरळीत सुरू होतं.                               मग येतो विणीचा मौसम. घरट्यातून 3- 4, 3 -4 अंडी दिसायला लागतात. चिमणा चिमणी आलटून पालटून त्यांचं रक्षण, भरण-पोषण करत होते. सगळ्या घरट्यातून हेच चित्र पाहायला ...

माझा एकदाचा ट्रेक....

माझा मित्र श्री. श्रीवल्लभ साठे याने नोकरी सोडायचा निर्णय घेऊन स्वतंत्र व्यवसाय करायचा ठरवलं तेव्हा मला जरा धक्काच बसला होता. पण काल त्याच्यासोबत ट्रेकला गेले आणि मला त्याचा निर्णय पटला. किती मनापासून जीव ओतून तो ते सर्व काम यथासांग पार पाडतो! तेसुद्धा फक्त उरकायचं किंवा ते उदरनिर्वाहाचं साधन आहे म्हणून टाकणं टाकल्यासारखं नाही तर खूप मन लावून!!!                        वल्लभने आतापर्यंत स्वतंत्र असे 17 ट्रेक्स अरेंज केले. मी या तळगड च्या ट्रेक ला त्याच्यासोबत गेले ती पहिल्यांदाच. यापूर्वी ऑगस्टमध्ये जाणार होते पण पावसाच्या(अव) कृपेमुळे नाही जाता आलं. यावेळी त्याने जवळजवळ मला ओढुनच नेलं म्हटलं तरी चालेल. " उमा, हा ट्रेक तुला नक्की जमेल. येच तू." इति वल्लभ. सो आमची स्वारी निघाली. सोबत कमीतकमी सामान आणि चालायला , चढायला त्रास होणार नाही असा पेहराव आणि महत्वाचं म्हणजे त्यानिमित्ताने घेतलेले शूज घातले आणि ध्यान निघालं पहाटे 5 ला.                        मयुरेश पंडित माझा स...

अंगणातली दुपार

अशीच एक मरगळलेली दुपार. घरातील सर्वच मंडळी जेवून जरा वामकुक्षी वगैरे साठी आडवी झालीत. पण तिला मात्र का कुणास ठाऊक आज झोप येतंच नव्हती. घरात कसतरीच वाटत होतं म्हणून ती उठली आणि सरळ अंगणात येऊन बसली, पडवीच्या पायरीवर.                        दुपारचं हे निवांत अंगण तिने याआधी कधीच पाहिलं नव्हतं, अनुभवलं नव्हतं. थंडीच्या दिवसात अंगणातील झाडांच्या फांद्यांमधून येणारे उन्हाचे किरण खूपच हवेहवेसे वाटत होते. किती तरी प्रकारची झाडे लावली होती त्याने. आंबा, फणस, पोफळी, माड हे तर होतेच पण सोबत कितीतरी फुलझाडं पण. आंबा फणसाच्या फांद्यांच्या आडून दिसणारं ते छोटंसं आभाळ तिच्या मनाला खूप साद घालत होतं. माडांच्या सावळांतून येणारे सूर्यकिरण आल्हाददायक तसंच आश्वासकही वाटतं होते. सकाळीच शिंपण केल्यामुळे झाडांच्या बुंधात अजूनही ओलावा कायम होता. जसा तिच्या मनातही होता. मातीचा ओला वास, सूर्यकिरणांमुळे लकाकणारे पानांवरले पाण्याचे बिंदू खूप खूपच मोहक दिसत होते. रेंगाळलेला सूर्यनारायण खूप हवाहवासा वाटत होता जणू काही तो तिच्याशी गप्पा मारायलाच थांबला हो...
*शक्तीचा जागर आणि विजयाची दशमी*              गेले दहा दिवस म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमी पर्यंत आणि आज दशमी म्हणजे दसरा आपण सर्वजण जगन्मातेची आदिमायेची आपापल्या परीने उपासना करत आहोत. अनेकविध नावे आणि रूपे असलेली ही जगदंबा आपली साऱ्यांचीच जननी आहे तिच आहे जी आपल्याला संकटातून बाहेर येण्याची प्रेरणा देते.                  महिषासुराचा वाढलेला उत्पात जेव्हा देवांना थांबवणे शक्य झाले नाही तेव्हा त्रिदेवांनी आपापल्या अंशातून एकत्रित अशी या दुर्गेची निर्मिती केली आहे. त्यामुळे इथे एक लक्षात घेतले पाहिजे की हे ultimate स्रीरुप जे आहे ते त्रिदेवांचे सार आहे आणि म्हणूनच स्त्री ही जन्मदात्री असते, पालनकर्ती असते तसेच चुकांना शासनही करते.                  तर अशी ही महिषासुरमर्दिनी जिने सतत नऊ दिवस युद्ध करून महिषासुराचा वध केला आणि पृथ्वीला त्याच्या त्रासातून मुक्ती मिळवून दिली. मग एक प्रश्न उरतो की ही नवनिर्मिती कशासाठी? त्रिदेवांना एकत्र येऊन महिषासुराचा ...
नदी.....                   नदी- ईकारांत स्त्रीलिंगी. नदी-नदयौ-नद्या: प्रथमा एकदम संस्कृतच्या तासाला बसल्यासारखं वाटलं नाही ! नदी हा शब्द स्त्रीलिंगीच का बरे झाला असावा? स्त्री नाही का आपला उगम सोडून दुसरीकडे जाऊन विलीन होते तसच नाही का नदीचं पण? दूर डोंगरात उगम पावून अगदी पल्याड त्या सागरात जाऊन विलीन होते की नदी! म्हणूनच बहुदा नदी हा स्त्रीलिंगी शब्द असावा.               असं म्हणतात की ऋषीचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू नये! पण नदी जिथून उगम पावते तिथपासून ते अगदी जिथे सागराला जाऊन मिळते तिथपर्यंत सर्वांचे जीवन समृद्ध करत जाते. डोंगरावरून वाहत येताना सोबत गाळ घेऊन येते आणि संथ वाहते त्या प्रांतात काठावर तो गाळ पेरून जमीन कशी सुपीक करून जाते. स्त्रीचं पण तसंच नाही का? माहेरच्या संस्कारांचं संचित घेऊन सासरी पेरत मुलाबाळांना वाढवत सुपीक बनवत असते तीही अविरत अगदी नदीसारखी!               संस्कृत भाषेत प्रत्येक शब्दाची विविध रूपे असतात विभक्तीप्रमाणे. नदीची पण अशीच अनेक रूपं बघायल...
*आम्ही सगळ्या दुर्गा*                    आज कॉलेजला सुट्टी होती आणि नवरात्रीचे दिवसही आहेत तर त्याचे निमित्त साधून मी आणि माझा लेक 'रत्नदुर्ग' किल्ल्यावरील भगवतीच्या दर्शनाला जाण्याचा बेत आखला. आजचा निळा रंग म्हणून दोघेही निळे कपडे घालून चॅन तयार होऊन निघालो माझ्या दुचाकीवरून.                    "अलोट गर्दी असेल किल्ल्यावर", असं मनाशी म्हणत असतानाच गाड्यांच्या लांबच लांब रांगा दिसू लागल्या. जवळ जवळ एक किलोमीटर लांब गाडी लावून आम्ही चालत चालत निघालो.                       आजूबाजूला उत्साह नुसता ओसंडून वाहत होता. सगळ्या कालियुगातल्या दुर्गा छान नटून थटून, आपली लेकरं बाळं सांभाळत, नवऱ्याशी बोलत, ओटीचं ताट सांभाळत चालत होत्या. मोठं मोहक दृश्य होतं ते.                         पायऱ्या चढून देवळाच्या आवारात आलो तर दर्शनासाठीदेखील भली मोठी रंग होती. ती पाहून चिरंजीव म्हणाले,"मी ...