आपल्याला अनेक माणसं भेटतात. काही जण नुसतेच भेटतात. काहींशी परिचय वाढतो. काहींशी मैत्री जुळते तर काही त्याही पलीकडे जाऊन आपल्या आयुष्यात ठाण मांडून बसतात.
प्रत्येक नग वेगळा. एकसारखा नसे दुजा. एक उंच तर दुसरा खुजा. एक बोलका तर दुसऱ्याला लळा अबोल्याचा. एक श्रीमंत तर दुसरा गरीब. एक खेळकर तर दुसरा गंभीर. अशी अनंत प्रकारची माणसे आपलं आयुष्य समृद्ध करत असतात.
सुखद दुःखद आठवणींनी आपला भूतकाळ व्यापून टाकण्यात या मंडळींचा फार मोठा वाटा असतो. पण आपण अनेकदा सुखद आठवणी देणाऱ्यांपेक्षा दुःख देणाऱ्यांनाच अधिक लक्षात ठेवतो आणि बसतो मनःस्ताप करून घेत.
ही जी अनेक माणसे आपल्या आयुष्यात येऊन जाऊन असतात त्यांना पात्र म्हणावं का आपल्या जीवननाट्यातली? नाटकात नाही का अगदी पहिल्या प्रवेशात आलेलं पात्र नंतर कधीतरी अगदी शेवटच्या अंकातील एखाद्या प्रवेशात परत रंगमंचावर येतं तशीच काही माणसं देखील आपल्या नजरेआड गेलेली असतात. ती असतात फक्त आपल्या स्मृतीत आणि कधीतरी अचानक ती आपल्या समोर येतात आणि आपल्या आयुष्याचा पुन्हा एक भाग बनतात.
काही माणसं आपल्या आयुष्यात का आली? असाही प्रश्न आपल्याला पडतो. म्हणजे नसती आली तर बरं झालं असतं वगैरे वाटण्या इतपत आपण त्यांचा तिरस्कार करतो. याउलट काही माणसं आपल्याला सतत आपल्यासोबत हवी असतात. पण दुर्दैवाने नेमकी तिच दुरावतात या ना त्या कारणाने. ज्यांच्याशी आपली तार जुळते ती मंडळी अगदी मरते दम तक साथ देतात आणि अगदीच साथ सोडावी लागणार असेल तर चुटपुट लावून जातात जीवाला आपल्या आणि स्वतःच्याही. मनाचा एक कोपरा कायमचा हळवा करून exit घेतात.
किती प्रकारची, स्वभावाची, रंगांची, भाषा जाणणारी माणसं आपण आभूषणांप्रमाणे वागवत असतो. जितकी आभूषणे अधिक तितकं आपलं जीवन अधिक समृद्ध होत जातं. आयुष्यात जर काही शाश्वत असेल तर हेच आहे ते म्हणजे हा लोकसंग्रह.
हा विचार सुरू असतानाच तिरक्या बुद्धीने त्याला छेद दिला. आपणही कोणाच्या तरी आयुष्यरूपी नाटकातील एक पात्र असणार. आपली पण entry आणि exit असणार. ती फक्कड जमवणं एवढंच काय ते आपल्या हातात. आपल्याला आपल्या नाटकातल्या पात्रांनी कशी entry घेतलेली आवडेल तशीच किंवा त्याहूनही सरस अशी आपण entry घ्यावी. Entry लाच भरपूर टाळ्या पडाव्यात आणि exit हुरहूर लावून जावी. बास हे एकच गणित जमावं. मग सगळं कसं आपोआप प्रकाशमान होईल....
© उमा जोशी ०७/१२/२०१९
PC: Google.
प्रत्येक नग वेगळा. एकसारखा नसे दुजा. एक उंच तर दुसरा खुजा. एक बोलका तर दुसऱ्याला लळा अबोल्याचा. एक श्रीमंत तर दुसरा गरीब. एक खेळकर तर दुसरा गंभीर. अशी अनंत प्रकारची माणसे आपलं आयुष्य समृद्ध करत असतात.
सुखद दुःखद आठवणींनी आपला भूतकाळ व्यापून टाकण्यात या मंडळींचा फार मोठा वाटा असतो. पण आपण अनेकदा सुखद आठवणी देणाऱ्यांपेक्षा दुःख देणाऱ्यांनाच अधिक लक्षात ठेवतो आणि बसतो मनःस्ताप करून घेत.
ही जी अनेक माणसे आपल्या आयुष्यात येऊन जाऊन असतात त्यांना पात्र म्हणावं का आपल्या जीवननाट्यातली? नाटकात नाही का अगदी पहिल्या प्रवेशात आलेलं पात्र नंतर कधीतरी अगदी शेवटच्या अंकातील एखाद्या प्रवेशात परत रंगमंचावर येतं तशीच काही माणसं देखील आपल्या नजरेआड गेलेली असतात. ती असतात फक्त आपल्या स्मृतीत आणि कधीतरी अचानक ती आपल्या समोर येतात आणि आपल्या आयुष्याचा पुन्हा एक भाग बनतात.
काही माणसं आपल्या आयुष्यात का आली? असाही प्रश्न आपल्याला पडतो. म्हणजे नसती आली तर बरं झालं असतं वगैरे वाटण्या इतपत आपण त्यांचा तिरस्कार करतो. याउलट काही माणसं आपल्याला सतत आपल्यासोबत हवी असतात. पण दुर्दैवाने नेमकी तिच दुरावतात या ना त्या कारणाने. ज्यांच्याशी आपली तार जुळते ती मंडळी अगदी मरते दम तक साथ देतात आणि अगदीच साथ सोडावी लागणार असेल तर चुटपुट लावून जातात जीवाला आपल्या आणि स्वतःच्याही. मनाचा एक कोपरा कायमचा हळवा करून exit घेतात.
किती प्रकारची, स्वभावाची, रंगांची, भाषा जाणणारी माणसं आपण आभूषणांप्रमाणे वागवत असतो. जितकी आभूषणे अधिक तितकं आपलं जीवन अधिक समृद्ध होत जातं. आयुष्यात जर काही शाश्वत असेल तर हेच आहे ते म्हणजे हा लोकसंग्रह.
हा विचार सुरू असतानाच तिरक्या बुद्धीने त्याला छेद दिला. आपणही कोणाच्या तरी आयुष्यरूपी नाटकातील एक पात्र असणार. आपली पण entry आणि exit असणार. ती फक्कड जमवणं एवढंच काय ते आपल्या हातात. आपल्याला आपल्या नाटकातल्या पात्रांनी कशी entry घेतलेली आवडेल तशीच किंवा त्याहूनही सरस अशी आपण entry घ्यावी. Entry लाच भरपूर टाळ्या पडाव्यात आणि exit हुरहूर लावून जावी. बास हे एकच गणित जमावं. मग सगळं कसं आपोआप प्रकाशमान होईल....
© उमा जोशी ०७/१२/२०१९
PC: Google.

Comments
Post a Comment