एका जंगलात एक मोठा वृक्ष होता. खूप जुना एखाद्या ध्यानस्थ ऋषीसारखा तो जंगलाच्या मधोमध उभा होता. निश्चल, अभेद्य, पुराण आणि खंबीर. अनेक घरटी त्याच्या अंगाखांद्यावर होती. त्या घरट्यांतूनअनेक संसार अगदी सुरळीतपणे सुरू होते. चिमणा चिमणी आपला संसार काडी काडी करून जोडत होते. सगळे जण एकमेकांसोबत गुण्या गोविंदाने नांदत होते.
प्रत्येकाचा संसार सुरू होता. कोणाला कमी तर कोणाला जास्त असं काही ना काही पदरात पडतच होतं आणि त्यात ती सर्व मंडळी खुश होती. चिमणा चिमणी दोघेही आपल्या आपल्या परीने आपलं घरटं सजवण्याचा, सावरण्याचा, वाढवण्याचा प्रयत्न करीत होते. झालंच तर अगदी शेजाऱ्याला पण मदत करत होते, मदत मागत होते. सगळं कसं अगदी सुरळीत सुरू होतं.
मग येतो विणीचा मौसम. घरट्यातून 3- 4, 3 -4 अंडी दिसायला लागतात. चिमणा चिमणी आलटून पालटून त्यांचं रक्षण, भरण-पोषण करत होते. सगळ्या घरट्यातून हेच चित्र पाहायला मिळत होतं. सगळीकडे कसा आनंदीआनंद होता. सर्वजण आतुर होते ते नव्या चिमुकल्या पिल्लांना पाहण्यासाठी.
निसर्गनियमाप्रमाणे अंड्यातून छोटी छोटी पिल्लं बाहेर आली. सर्व वृक्ष चिवचिवाटाने अगदी मोहरून गेला. सगळीकडे छोट्या छोट्या चोचा वासून ही चिल्लीपिल्ली सतत चिवचिवाट करत होती पण कोणालाच त्याचा त्रास होत नव्हता. उलट कौतुकच वाटत होतं सर्वांना.
दिसामासाने ही पिल्लं वाढत होती. वृक्ष अजून अजून मोठा होत होता आणि चिमणा चिमणी अजून अजून बिझी होत होती. पिल्लांना वाढवणं, त्यांचं भरण पोषण याची जबाबदारी ते आलटून पालटून उचलत होते. सगळं कसं अगदी सुरळीत चाललं होतं.
आणि हाय रे दुर्दैव! पावसाळ्याचे दिवस होते. सगळी खबरदारी चिमणा आणि चिमणीने घेतलेली. हे नित्याचंच होतं. दरवर्षीच तर आपण अशी खबरदारी घेतो की. पण यंदा देवाच्या मनात काहीतरी वेगळाच होतं.
यंदाचा पाऊस काहीतरी वेगळाच होता. ध्यानस्थ वृक्ष सुद्धा यंदा थरारला होता. अगदी वेड्यासारखा कोसळणारा पाऊस एक दिवस आपल्यासोबत चिमणीचं घरटंच घेऊन गेला. आणि सोबत तिचा चिमणासुद्धा. मागे राहिली ती, तिची पिल्लं आणि टीपं गळणारा म्हातारा वृक्ष.
तिने खूप आक्रोश केला. पावसाला, देवाला, दैवाला खूप बोल लावला. तिचा तो आक्रोश बाकी सगळ्या घरट्यानी ऐकला पण ते तिला आवरू शकले नाहीत. पण मग तिने ठरवलं आता आपण पुन्हा सुरूवात करायची. परत काडी काडी जोडायची, परत घरटं बांधायचं, नाही हारायचं, पिल्लांना मोठं करायचं. ती डगमगली नाही थोडीशी भ्याली पण सिद्ध झाली. आणि तो पुराण खंबीर वृक्ष होताच की तिच्या सोबत!
पुन्हा ढग विरले, आभाळ स्वच्छ झालं, सोनेरी सूर्यकिरणे पुन्हा पसरली. जो तो आपल्या व्यापात गुंतला. तशीच ती चिमणी पण आपल्या व्यापात गुंतली आणि चिमणा नसलेलं तिचं घरटं पुन्हा नांदतं झालं, चिमण्याच्या आठवणीसोबत पुढे जाऊ लागलं...
©उमा जोशी
PC: Google
प्रत्येकाचा संसार सुरू होता. कोणाला कमी तर कोणाला जास्त असं काही ना काही पदरात पडतच होतं आणि त्यात ती सर्व मंडळी खुश होती. चिमणा चिमणी दोघेही आपल्या आपल्या परीने आपलं घरटं सजवण्याचा, सावरण्याचा, वाढवण्याचा प्रयत्न करीत होते. झालंच तर अगदी शेजाऱ्याला पण मदत करत होते, मदत मागत होते. सगळं कसं अगदी सुरळीत सुरू होतं.
मग येतो विणीचा मौसम. घरट्यातून 3- 4, 3 -4 अंडी दिसायला लागतात. चिमणा चिमणी आलटून पालटून त्यांचं रक्षण, भरण-पोषण करत होते. सगळ्या घरट्यातून हेच चित्र पाहायला मिळत होतं. सगळीकडे कसा आनंदीआनंद होता. सर्वजण आतुर होते ते नव्या चिमुकल्या पिल्लांना पाहण्यासाठी.
निसर्गनियमाप्रमाणे अंड्यातून छोटी छोटी पिल्लं बाहेर आली. सर्व वृक्ष चिवचिवाटाने अगदी मोहरून गेला. सगळीकडे छोट्या छोट्या चोचा वासून ही चिल्लीपिल्ली सतत चिवचिवाट करत होती पण कोणालाच त्याचा त्रास होत नव्हता. उलट कौतुकच वाटत होतं सर्वांना.
दिसामासाने ही पिल्लं वाढत होती. वृक्ष अजून अजून मोठा होत होता आणि चिमणा चिमणी अजून अजून बिझी होत होती. पिल्लांना वाढवणं, त्यांचं भरण पोषण याची जबाबदारी ते आलटून पालटून उचलत होते. सगळं कसं अगदी सुरळीत चाललं होतं.
आणि हाय रे दुर्दैव! पावसाळ्याचे दिवस होते. सगळी खबरदारी चिमणा आणि चिमणीने घेतलेली. हे नित्याचंच होतं. दरवर्षीच तर आपण अशी खबरदारी घेतो की. पण यंदा देवाच्या मनात काहीतरी वेगळाच होतं.
यंदाचा पाऊस काहीतरी वेगळाच होता. ध्यानस्थ वृक्ष सुद्धा यंदा थरारला होता. अगदी वेड्यासारखा कोसळणारा पाऊस एक दिवस आपल्यासोबत चिमणीचं घरटंच घेऊन गेला. आणि सोबत तिचा चिमणासुद्धा. मागे राहिली ती, तिची पिल्लं आणि टीपं गळणारा म्हातारा वृक्ष.
तिने खूप आक्रोश केला. पावसाला, देवाला, दैवाला खूप बोल लावला. तिचा तो आक्रोश बाकी सगळ्या घरट्यानी ऐकला पण ते तिला आवरू शकले नाहीत. पण मग तिने ठरवलं आता आपण पुन्हा सुरूवात करायची. परत काडी काडी जोडायची, परत घरटं बांधायचं, नाही हारायचं, पिल्लांना मोठं करायचं. ती डगमगली नाही थोडीशी भ्याली पण सिद्ध झाली. आणि तो पुराण खंबीर वृक्ष होताच की तिच्या सोबत!
पुन्हा ढग विरले, आभाळ स्वच्छ झालं, सोनेरी सूर्यकिरणे पुन्हा पसरली. जो तो आपल्या व्यापात गुंतला. तशीच ती चिमणी पण आपल्या व्यापात गुंतली आणि चिमणा नसलेलं तिचं घरटं पुन्हा नांदतं झालं, चिमण्याच्या आठवणीसोबत पुढे जाऊ लागलं...
©उमा जोशी
PC: Google

Comments
Post a Comment