आज ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार. आज मैत्री दिन साजरा करतात म्हणे! हे मला हल्लीच कळलंय म्हणा.
मैत्री कोणाशी करावी की जुळावी याचा असा काही ठोक फॉर्म्युला नाही. एखाद्याशी पटलं जमलं की आपोआप जुळते मैत्री!
पक्के मित्र, जिगरी यार वगैरे संज्ञा या मैत्रीला दिल्या जातात. कृष्ण-सुदामा ही मैत्रीची फेमस जोडी. रंग रूप भाषा जात धर्म लिंग आर्थिक स्थिती काहीही मैत्रीच्या आड येत नाही. ज्याच्याशी wave length जुळली त्याच्याशी मैत्रीचे बंध घट्ट बांधले जातात.
असं म्हणतात की मित्राला आपण न सांगताच नुसतं पाहून आपल्या मनातील भावना कळतात. काही पठ्ठे तर नुसत्या आवाजाच्या टोन वरून सांगतात काही जण तर कधीकधी सायलेन्स पण ऐकतात आणि म्हणतात " बिनसलंय का काही आज तुझं?" असे हे मित्र!
जीवाभावाचे, गरजेला धावून येणारे, निर्हेतुक प्रेम करणारे, रडायला खांदा देणारे, ऐकायला कान देणारे, सावरणारे, समजून घेणारे, समजूत घालणारे, रागावणारे, हसवणारे, असे हे मित्र आपल्या आयुष्यात रक्ताच्या, जोडलेल्या आशा सगळ्या नात्यांपेक्षा किती तरी महत्वाचे असतात.
जे पक्के मित्र असतात, ते कितीही गैरसमज झाले तरी मैत्री तोडत नाहीत. काही काळ अबोला होतो पण होतो नंतर गोडवा. मित्र कोणताही पुढचा मागचा विचार ना करता बोलता येणारी, रडता येणारी अशी जागा. ही जागा प्रत्येकाच्याच आयुष्यात असावी आणि त्याची व्याप्ती अधिकाधिक वाढावी हीच या मैत्रदिनी सदिच्छा ....
©उमा जोशी (०५/०८/२०१९)
PC: Google..
मैत्री कोणाशी करावी की जुळावी याचा असा काही ठोक फॉर्म्युला नाही. एखाद्याशी पटलं जमलं की आपोआप जुळते मैत्री!
पक्के मित्र, जिगरी यार वगैरे संज्ञा या मैत्रीला दिल्या जातात. कृष्ण-सुदामा ही मैत्रीची फेमस जोडी. रंग रूप भाषा जात धर्म लिंग आर्थिक स्थिती काहीही मैत्रीच्या आड येत नाही. ज्याच्याशी wave length जुळली त्याच्याशी मैत्रीचे बंध घट्ट बांधले जातात.
असं म्हणतात की मित्राला आपण न सांगताच नुसतं पाहून आपल्या मनातील भावना कळतात. काही पठ्ठे तर नुसत्या आवाजाच्या टोन वरून सांगतात काही जण तर कधीकधी सायलेन्स पण ऐकतात आणि म्हणतात " बिनसलंय का काही आज तुझं?" असे हे मित्र!
जीवाभावाचे, गरजेला धावून येणारे, निर्हेतुक प्रेम करणारे, रडायला खांदा देणारे, ऐकायला कान देणारे, सावरणारे, समजून घेणारे, समजूत घालणारे, रागावणारे, हसवणारे, असे हे मित्र आपल्या आयुष्यात रक्ताच्या, जोडलेल्या आशा सगळ्या नात्यांपेक्षा किती तरी महत्वाचे असतात.
जे पक्के मित्र असतात, ते कितीही गैरसमज झाले तरी मैत्री तोडत नाहीत. काही काळ अबोला होतो पण होतो नंतर गोडवा. मित्र कोणताही पुढचा मागचा विचार ना करता बोलता येणारी, रडता येणारी अशी जागा. ही जागा प्रत्येकाच्याच आयुष्यात असावी आणि त्याची व्याप्ती अधिकाधिक वाढावी हीच या मैत्रदिनी सदिच्छा ....
©उमा जोशी (०५/०८/२०१९)
PC: Google..

Comments
Post a Comment