गेल्याच आठवड्यात मकरसंक्रांत होऊन गेली. आता रथसप्तमीपर्यंत हळदीकुंकवाचे समारंभ सुरू राहतील. आपल्या संस्कृतीत समारंभांना विशेष महत्व आहे. प्रत्येक सणाला धरून समारंभ असतोच. हे सगळे समारंभ आपल्याला एकत्र आणतात, संवाद वाढवतात (काही वेळा वादही), आपुलकी माणुसकी समृद्ध करतात.
संक्रांतीच्या निमित्ताने होणाऱ्या तिळगुळ आणि हळदीकुंकू समारंभाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात लुटणाऱ्या वस्तू. महाराष्ट्रात सर्वत्रच बहुदा हा सण थोड्या फार फरकाने असाच साजरा करतात. नवविवाहित स्त्रीच्या विवाहापासूनच्या पहिल्या 5 वर्षात काय वस्तू लुटाव्यात याबद्दल काही अलिखित नियम आहेत. त्यानंतर काहीही लुटावे आपल्याला हवे ते.
"अहो यंदा काय देऊ सगळ्या बायकांना संक्रांतीचे वाण म्हणून?" यावर अहोंचे उत्तर, "माझा मोबाईल नंबर दे" हे असले पांचट जोक्स सोशल साईट्स वर मुबलक फिरू लागतात संक्रांत जवळ आली की. काय तर म्हणे माझा नंबर दे! किती चुकीचा संदेश जातो या जोकमधून याचा कोणी विचारच करत नाही, ह्याह्या हसायचं आणि फॉरवर्ड किंवा शेअर करायचा हाच उद्योग! आहे का असले उद्दिष्ट आपल्या सणांचे, संस्कृतीचे?
हा वेडेपणा एकीकडे तर दुसरीकडे कोणत्या तरी अमुक अमुक गावात खास विधवांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजनाची बातमी. विधवा ! कोणीतरी जळजळीत अंगार कानावर ठेवावा असा जाणवतो हा शब्द. विगत(दूर) आहे धव(नवरा) जिचा अशी ती, असा सामासिक विग्रह असलेल्या या शब्दाची सामाजिक व्याख्या मात्र थोडी विचित्र आहे. आपल्या समाजात विधवेला कोणी कुंकू लावत नाही किंबहुना तिने स्वतःनेही ते लावू नये असाच समज आहे. खरं पाहिलं तर एखादीचा नवरा जीवित असण्याचा किंवा जीवित नसण्याचा आणि कुंकू लावण्याचा काही संबंध असू नये असं माझं मत आहे कारण नवरा तिच्या आयुष्यात येण्यापुर्वीपासूनच कुंकू तिच्या आयुष्यात असतंच की! त्यामुळे विधवेला मी तुला कुंकू लावलं म्हणजे तुझा सन्मान केला वगैरे भावना स्त्रियांनी बाळगू नये असं आपलं माझं बाळबोध मत.
खरं तर हे वाण लुटणे हा प्रकार बऱ्याचशा स्त्रियांच्या स्टेटसचाही प्रश्न बनतो. सोसायटीत अमकीने ते लुटलं, तमकीने हे लुटलं मग मी का मागे राहावं? किंवा एखादीची परिस्थिती नसेल तरी ती सगळ्या आपल्याला बोलावतात मग आपण नको का त्यांना बोलवायला म्हणूनही बिचारी पदरमोड करून हळदीकुंकू आणि वाण समारंभ करते. खरच पण अशा प्रघातांमुळे सामाजिक दरी वाढू लागेल की काय अशीही शंका येते मनात अनेकदा.
"काय लुटावे?" या प्रश्नाला एक सरळ उत्तर असेल ,"जे तुला शक्य आहे ते!" काय वाटुया ? दुःख घेऊया ना सगळ्याची वाटून, उपेक्षा हिरावून घेऊया सर्वांच्या , कमीपणा; मानभंग; मनोभंग; तेजोभंग; अपमान; चिंता दूर करायचा प्रयत्न तर करूयात सर्व मिळून आणि सगळ्या जणी मिळून लुटूया फक्त आनंद आनंद आणि आनंद ....
©उमा 24/01/2019
PC: Google
संक्रांतीच्या निमित्ताने होणाऱ्या तिळगुळ आणि हळदीकुंकू समारंभाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात लुटणाऱ्या वस्तू. महाराष्ट्रात सर्वत्रच बहुदा हा सण थोड्या फार फरकाने असाच साजरा करतात. नवविवाहित स्त्रीच्या विवाहापासूनच्या पहिल्या 5 वर्षात काय वस्तू लुटाव्यात याबद्दल काही अलिखित नियम आहेत. त्यानंतर काहीही लुटावे आपल्याला हवे ते.
"अहो यंदा काय देऊ सगळ्या बायकांना संक्रांतीचे वाण म्हणून?" यावर अहोंचे उत्तर, "माझा मोबाईल नंबर दे" हे असले पांचट जोक्स सोशल साईट्स वर मुबलक फिरू लागतात संक्रांत जवळ आली की. काय तर म्हणे माझा नंबर दे! किती चुकीचा संदेश जातो या जोकमधून याचा कोणी विचारच करत नाही, ह्याह्या हसायचं आणि फॉरवर्ड किंवा शेअर करायचा हाच उद्योग! आहे का असले उद्दिष्ट आपल्या सणांचे, संस्कृतीचे?
हा वेडेपणा एकीकडे तर दुसरीकडे कोणत्या तरी अमुक अमुक गावात खास विधवांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजनाची बातमी. विधवा ! कोणीतरी जळजळीत अंगार कानावर ठेवावा असा जाणवतो हा शब्द. विगत(दूर) आहे धव(नवरा) जिचा अशी ती, असा सामासिक विग्रह असलेल्या या शब्दाची सामाजिक व्याख्या मात्र थोडी विचित्र आहे. आपल्या समाजात विधवेला कोणी कुंकू लावत नाही किंबहुना तिने स्वतःनेही ते लावू नये असाच समज आहे. खरं पाहिलं तर एखादीचा नवरा जीवित असण्याचा किंवा जीवित नसण्याचा आणि कुंकू लावण्याचा काही संबंध असू नये असं माझं मत आहे कारण नवरा तिच्या आयुष्यात येण्यापुर्वीपासूनच कुंकू तिच्या आयुष्यात असतंच की! त्यामुळे विधवेला मी तुला कुंकू लावलं म्हणजे तुझा सन्मान केला वगैरे भावना स्त्रियांनी बाळगू नये असं आपलं माझं बाळबोध मत.
खरं तर हे वाण लुटणे हा प्रकार बऱ्याचशा स्त्रियांच्या स्टेटसचाही प्रश्न बनतो. सोसायटीत अमकीने ते लुटलं, तमकीने हे लुटलं मग मी का मागे राहावं? किंवा एखादीची परिस्थिती नसेल तरी ती सगळ्या आपल्याला बोलावतात मग आपण नको का त्यांना बोलवायला म्हणूनही बिचारी पदरमोड करून हळदीकुंकू आणि वाण समारंभ करते. खरच पण अशा प्रघातांमुळे सामाजिक दरी वाढू लागेल की काय अशीही शंका येते मनात अनेकदा.
"काय लुटावे?" या प्रश्नाला एक सरळ उत्तर असेल ,"जे तुला शक्य आहे ते!" काय वाटुया ? दुःख घेऊया ना सगळ्याची वाटून, उपेक्षा हिरावून घेऊया सर्वांच्या , कमीपणा; मानभंग; मनोभंग; तेजोभंग; अपमान; चिंता दूर करायचा प्रयत्न तर करूयात सर्व मिळून आणि सगळ्या जणी मिळून लुटूया फक्त आनंद आनंद आणि आनंद ....
©उमा 24/01/2019
PC: Google

Comments
Post a Comment