*शक्तीचा जागर आणि विजयाची दशमी*
गेले दहा दिवस म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमी पर्यंत आणि आज दशमी म्हणजे दसरा आपण सर्वजण जगन्मातेची आदिमायेची आपापल्या परीने उपासना करत आहोत. अनेकविध नावे आणि रूपे असलेली ही जगदंबा आपली साऱ्यांचीच जननी आहे तिच आहे जी आपल्याला संकटातून बाहेर येण्याची प्रेरणा देते.
महिषासुराचा वाढलेला उत्पात जेव्हा देवांना थांबवणे शक्य झाले नाही तेव्हा त्रिदेवांनी आपापल्या अंशातून एकत्रित अशी या दुर्गेची निर्मिती केली आहे. त्यामुळे इथे एक लक्षात घेतले पाहिजे की हे ultimate स्रीरुप जे आहे ते त्रिदेवांचे सार आहे आणि म्हणूनच स्त्री ही जन्मदात्री असते, पालनकर्ती असते तसेच चुकांना शासनही करते.
तर अशी ही महिषासुरमर्दिनी जिने सतत नऊ दिवस युद्ध करून महिषासुराचा वध केला आणि पृथ्वीला त्याच्या त्रासातून मुक्ती मिळवून दिली. मग एक प्रश्न उरतो की ही नवनिर्मिती कशासाठी? त्रिदेवांना एकत्र येऊन महिषासुराचा निःपात करता आला असता ना? मग देवी का निर्मिली? मला असं वाटतं की तिघांनी एके ठिकाणी येणं आणि संगनमताने असुराचा नाश करणं हे वाटतं तितकं सुलभ नाही. मुळात ते तिघे सुप्रीम देव असले तरी त्यांच्यात एकमत होईलच असे नाही. मतभेद किंवा कृती करण्याच्या तंत्रात भेद असू शकतो आणि तेवढाही वेळ वाया जाऊ नये म्हणून कदाचित तिघांचेही उत्तमोत्तम गुण एकत्र करून (आणि दोष वगळून)दुर्गेची निर्मिती झाली असावी जेणेकरून वेळेचा आणि शक्तीचा अपव्यय टाळून महिषासुराचा वध व्हावा, जसा की तो झालाच.
तर मंडळी या नऊ दिवसात काय काय बदल झालेले दिसतात? एकतर सर्वत्र उत्साहाचं वातावरण असतं. पाऊस सरून ऊन पडायला सुरुवात झालेली असते. सर्वत्र हिरवळ असते. शेतं पिकून तरारून वर आलेली असतात. जरा मोकळा अवधी असतो सर्वांकडे. अशातच देवीची आराधना म्हणजे उत्साहाला उधाणच नाही का? तर आशा आल्हाददायक वातावरणात हा नवरात्रोत्सव सुरू होतो. देवीची प्रतिष्ठापना आरत्या पूजा नैवेद्य आणि मुख्य म्हणजे रात्रीचा गरबा!
आपल्या संस्कृतीतील बहुदा सर्वच सण समारंभ हे सर्वांनी एकत्र येऊन साजरे करावयाचे असतात. त्यातून संघटन शक्तीचे महत्वच आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न आहे. त्रिदेवांनी पण आपल्या शक्ती एक केल्या तेव्हाच असुराचा निःपात शक्य झाला. संघटित राहाल तर वाढाल ; वाचाल, विस्कळीत झालात तर मोडाल असाच तर संदेश नसेल ना त्यात!
देवीने अत्यंत तडफेने सातत्याने युद्ध करून महिषासुरला संपविले यातून काय बरे बोध घ्यावा? तर सातत्य आणि तडफ. अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची जिद्द. मग ती फक्त स्त्रीतच असावी असं नाही पुरुषही अन्यायाचे बळी होतातच की! कोणतेही संकट असो न घाबरता न डळमळता सातत्याने आणि निकराने सामना केला तर यश नक्की आहेच.
आता आला तो दसरा! विजयादशमी! महिषासुराचा वध झाला तो दिन, रावणाचा वध झाला तो दिवस. सुष्टांचा दुष्टांवरील विजयाचा दिवस! सातत्याने आपणही दुष्प्रवृत्ती, दुर्विचार, दुराचार यांना बळी पडत असतो किन्वा ते सहन करत असतो. असं म्हणतात की त्रास देणारा जितका दोषी त्याहूनही तो सहन करणारा अधिक दोषी. त्यामुळे आपल्या आतील दूषप्रवृत्तीचा नायनाट करण्यासाठी, आपल्या आजूबाजूला चाललेले दुराचार थांबविण्यासाठी सातत्याने प्रयत्न, लढा, प्रसंगी अगदी शस्त्रही उचलावे लागले तरी चालेल पण आपणही विजयाच्या 'दशमीची' चव चाखूयाच.....
©उमा जोशी. ०८/१०/२०१९(विजयादशमी)
गेले दहा दिवस म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमी पर्यंत आणि आज दशमी म्हणजे दसरा आपण सर्वजण जगन्मातेची आदिमायेची आपापल्या परीने उपासना करत आहोत. अनेकविध नावे आणि रूपे असलेली ही जगदंबा आपली साऱ्यांचीच जननी आहे तिच आहे जी आपल्याला संकटातून बाहेर येण्याची प्रेरणा देते.
महिषासुराचा वाढलेला उत्पात जेव्हा देवांना थांबवणे शक्य झाले नाही तेव्हा त्रिदेवांनी आपापल्या अंशातून एकत्रित अशी या दुर्गेची निर्मिती केली आहे. त्यामुळे इथे एक लक्षात घेतले पाहिजे की हे ultimate स्रीरुप जे आहे ते त्रिदेवांचे सार आहे आणि म्हणूनच स्त्री ही जन्मदात्री असते, पालनकर्ती असते तसेच चुकांना शासनही करते.
तर अशी ही महिषासुरमर्दिनी जिने सतत नऊ दिवस युद्ध करून महिषासुराचा वध केला आणि पृथ्वीला त्याच्या त्रासातून मुक्ती मिळवून दिली. मग एक प्रश्न उरतो की ही नवनिर्मिती कशासाठी? त्रिदेवांना एकत्र येऊन महिषासुराचा निःपात करता आला असता ना? मग देवी का निर्मिली? मला असं वाटतं की तिघांनी एके ठिकाणी येणं आणि संगनमताने असुराचा नाश करणं हे वाटतं तितकं सुलभ नाही. मुळात ते तिघे सुप्रीम देव असले तरी त्यांच्यात एकमत होईलच असे नाही. मतभेद किंवा कृती करण्याच्या तंत्रात भेद असू शकतो आणि तेवढाही वेळ वाया जाऊ नये म्हणून कदाचित तिघांचेही उत्तमोत्तम गुण एकत्र करून (आणि दोष वगळून)दुर्गेची निर्मिती झाली असावी जेणेकरून वेळेचा आणि शक्तीचा अपव्यय टाळून महिषासुराचा वध व्हावा, जसा की तो झालाच.
तर मंडळी या नऊ दिवसात काय काय बदल झालेले दिसतात? एकतर सर्वत्र उत्साहाचं वातावरण असतं. पाऊस सरून ऊन पडायला सुरुवात झालेली असते. सर्वत्र हिरवळ असते. शेतं पिकून तरारून वर आलेली असतात. जरा मोकळा अवधी असतो सर्वांकडे. अशातच देवीची आराधना म्हणजे उत्साहाला उधाणच नाही का? तर आशा आल्हाददायक वातावरणात हा नवरात्रोत्सव सुरू होतो. देवीची प्रतिष्ठापना आरत्या पूजा नैवेद्य आणि मुख्य म्हणजे रात्रीचा गरबा!
आपल्या संस्कृतीतील बहुदा सर्वच सण समारंभ हे सर्वांनी एकत्र येऊन साजरे करावयाचे असतात. त्यातून संघटन शक्तीचे महत्वच आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न आहे. त्रिदेवांनी पण आपल्या शक्ती एक केल्या तेव्हाच असुराचा निःपात शक्य झाला. संघटित राहाल तर वाढाल ; वाचाल, विस्कळीत झालात तर मोडाल असाच तर संदेश नसेल ना त्यात!
देवीने अत्यंत तडफेने सातत्याने युद्ध करून महिषासुरला संपविले यातून काय बरे बोध घ्यावा? तर सातत्य आणि तडफ. अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची जिद्द. मग ती फक्त स्त्रीतच असावी असं नाही पुरुषही अन्यायाचे बळी होतातच की! कोणतेही संकट असो न घाबरता न डळमळता सातत्याने आणि निकराने सामना केला तर यश नक्की आहेच.
आता आला तो दसरा! विजयादशमी! महिषासुराचा वध झाला तो दिन, रावणाचा वध झाला तो दिवस. सुष्टांचा दुष्टांवरील विजयाचा दिवस! सातत्याने आपणही दुष्प्रवृत्ती, दुर्विचार, दुराचार यांना बळी पडत असतो किन्वा ते सहन करत असतो. असं म्हणतात की त्रास देणारा जितका दोषी त्याहूनही तो सहन करणारा अधिक दोषी. त्यामुळे आपल्या आतील दूषप्रवृत्तीचा नायनाट करण्यासाठी, आपल्या आजूबाजूला चाललेले दुराचार थांबविण्यासाठी सातत्याने प्रयत्न, लढा, प्रसंगी अगदी शस्त्रही उचलावे लागले तरी चालेल पण आपणही विजयाच्या 'दशमीची' चव चाखूयाच.....
©उमा जोशी. ०८/१०/२०१९(विजयादशमी)

मस्तच
ReplyDeleteसुरेख
ReplyDelete