अशा वळणावर येऊन थांबलंय आता आयुष्य
जणू भासतो संपलाच आहे रस्ता
पण तरीही पुढे जाण्याची ओढ...
असंच नव्हतं का मागे सुद्धा वाटलेलं एका वळणावर
अंधार दाटला होता सर्वत्र आणि वाटा भासल्या होत्या थिजलेल्या...
उचंबळून म्हणून काही येतच नाही आताशा
धुमारे न फुटती कशाला आता
दुःखाला कोंब येतात आणि सुखाचा शिशिर सरेना...
कितीतरी प्रसंग आणि आठवणी पानगळतीप्रमाणे गळून पडली
रिते झाले मन सारे आणि बुद्धीही आता थकली..
हळूच कधीतरी डोकावते सोनेरी किरण सुखाचे
चांदण्या कैक लुकलूकतात आणि हलकेच चांदणे पाखर घालते...
वाटे कधी मिळावी पुन्हा साथ अशीच जीवाला
पण आताशा त्या वाटण्यातही जोर नाही उरला..
कळतच नाही कोण करतंय ही मागणी? मी? माझं शरीर? की मन माझं?
गुंत्यात या साऱ्या अडकून पडलेल्या जीवाला काहीच उमजत नाही...
वाटते मौज मनाला, बंधन झुगारून देण्यात
आणि मिळवण्यात आनंद उपभोगाचा
कारण आताशा जबाबदाऱ्यांचं ओझं खांद्याना पेलेनासं झालय जणू...
आजही खुणावतात तीच ती प्रलोभने, वेडावायची जशी पूर्वी अगदी तशीच.
पण आता मात्र त्यांचं वेड लागत नाही ,उलट सावधपणे खेळ खेळला जातोय त्यांच्यासोबत अगदी नकळत पणे...
पण नकळत तरी कसं म्हणावं या खेळाला? उतरती कागदावर जी अक्षरे मीच ना ती लिहिली आहेत?
का आताशा माझा मनावर आणि मेंदूवर माझ्याच ताबा नाही राहिला?
खरच असं कधीतरी मन आणि बुद्धी बाजूला काढून ठेवलं तर कसं वागेल हे शरीर?
मौज वाटतेय मला या कल्पनेची पण मन मात्र सूचक हसतंय...
कळूनही न कळण्याचा आव आणणारी मनोबुद्धि ही किती अकल्पित आणि अतिविचारी आहे नाही...
इथे आपणच आरोपी, आपणच वकील, आपणच फिर्यादी आणि आपणच न्यायाधीश.
काय सुरू आहे या न्यायालयात? कोणता न्याय मागतेय मी? की न्याय मागण्याच्या पडद्यामागे अन्यायाचेच समर्थन सुरू आहे?
कठीणच आहे हा गुंता पण सुटेल अशी आशा आहे, प्रयत्न सोडणाऱ्याच्या पदरी कायमच घोर निराशा आहे.
अपल्यावरही आहे एक न्यायाधीश, जो मांडतोय जमाखर्चाचे हिशोब
येतोय तो आयुष्यात आपल्या फक्त कधी कुठे कसा नाही सांगता येत.
खूप झाले म्हणता म्हणता लक्षात आता येत आहे
हे तर काहीच नाही अजून खूप काही बाकी आहे..
आता भार तुम्हावरच सावळ्या, दयाघना करी सांभाळ, मी नसे तुझी भक्त अपार
परी पार करण्या हा भवताल दे मला हिंमत अपार...
© उमा जोशी ०९/१२/२०१९
PC: Mr. Tanmay Joshi
जणू भासतो संपलाच आहे रस्ता
पण तरीही पुढे जाण्याची ओढ...
असंच नव्हतं का मागे सुद्धा वाटलेलं एका वळणावर
अंधार दाटला होता सर्वत्र आणि वाटा भासल्या होत्या थिजलेल्या...
उचंबळून म्हणून काही येतच नाही आताशा
धुमारे न फुटती कशाला आता
दुःखाला कोंब येतात आणि सुखाचा शिशिर सरेना...
कितीतरी प्रसंग आणि आठवणी पानगळतीप्रमाणे गळून पडली
रिते झाले मन सारे आणि बुद्धीही आता थकली..
हळूच कधीतरी डोकावते सोनेरी किरण सुखाचे
चांदण्या कैक लुकलूकतात आणि हलकेच चांदणे पाखर घालते...
वाटे कधी मिळावी पुन्हा साथ अशीच जीवाला
पण आताशा त्या वाटण्यातही जोर नाही उरला..
कळतच नाही कोण करतंय ही मागणी? मी? माझं शरीर? की मन माझं?
गुंत्यात या साऱ्या अडकून पडलेल्या जीवाला काहीच उमजत नाही...
वाटते मौज मनाला, बंधन झुगारून देण्यात
आणि मिळवण्यात आनंद उपभोगाचा
कारण आताशा जबाबदाऱ्यांचं ओझं खांद्याना पेलेनासं झालय जणू...
आजही खुणावतात तीच ती प्रलोभने, वेडावायची जशी पूर्वी अगदी तशीच.
पण आता मात्र त्यांचं वेड लागत नाही ,उलट सावधपणे खेळ खेळला जातोय त्यांच्यासोबत अगदी नकळत पणे...
पण नकळत तरी कसं म्हणावं या खेळाला? उतरती कागदावर जी अक्षरे मीच ना ती लिहिली आहेत?
का आताशा माझा मनावर आणि मेंदूवर माझ्याच ताबा नाही राहिला?
खरच असं कधीतरी मन आणि बुद्धी बाजूला काढून ठेवलं तर कसं वागेल हे शरीर?
मौज वाटतेय मला या कल्पनेची पण मन मात्र सूचक हसतंय...
कळूनही न कळण्याचा आव आणणारी मनोबुद्धि ही किती अकल्पित आणि अतिविचारी आहे नाही...
इथे आपणच आरोपी, आपणच वकील, आपणच फिर्यादी आणि आपणच न्यायाधीश.
काय सुरू आहे या न्यायालयात? कोणता न्याय मागतेय मी? की न्याय मागण्याच्या पडद्यामागे अन्यायाचेच समर्थन सुरू आहे?
कठीणच आहे हा गुंता पण सुटेल अशी आशा आहे, प्रयत्न सोडणाऱ्याच्या पदरी कायमच घोर निराशा आहे.
अपल्यावरही आहे एक न्यायाधीश, जो मांडतोय जमाखर्चाचे हिशोब
येतोय तो आयुष्यात आपल्या फक्त कधी कुठे कसा नाही सांगता येत.
खूप झाले म्हणता म्हणता लक्षात आता येत आहे
हे तर काहीच नाही अजून खूप काही बाकी आहे..
आता भार तुम्हावरच सावळ्या, दयाघना करी सांभाळ, मी नसे तुझी भक्त अपार
परी पार करण्या हा भवताल दे मला हिंमत अपार...
© उमा जोशी ०९/१२/२०१९
PC: Mr. Tanmay Joshi

खूप छान
ReplyDeleteहे असलं द्वंव प्रत्येकाच्या मनात रोज
ह्यात कोणीच फिर्यादी नाही व सगळेच न्यायाधिश