विश्वबंधुत्वाच्या दिशेने एक पाऊल...
मित्रांनो आज ११ सप्टेंबर. हा दिनांक आणि अमेरिका यांचं एक पक्के नातं आहे. दोन वेगवेगळ्या कारणांनी या दिवशी पूर्ण अमेरिकाच काय पण सारं जगच हादरलं होतं. फक्त एक धक्का सुखद होता तर दुसरा दुःखद. एकाने सर्वांना एकत्र येण्यासाठी साद घातली तर दुसऱ्याने दहशत पसरवली. एकाने सर्वांना प्रेमाने ज्ञानाने आपलेसे केले तर दुसऱ्याने मात्र सगळ्यांना सळो की पळो करून सोडले.
अगदी अचूक ओळखलंत सगळ्यांनी. ११ सप्टेंबर २००१ या रोजी ओसामा बिन लादेनच्या अल कायदा या दहशतवादी संघटनेने अमेरिकेच्या संरक्षण क्षेत्राशी निगडित अशा पेंटागॉन तसच वर्ल्ड ट्रेड सेंटर या इमारतींवर विमाने वापरून हल्ला केला. अपरिमित वित्त व जीवित हानी झाली आणि साध्य काय झालं तर काहीच नाही. स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्याचा हव्यासापोटी निरपराध जीवांचे बळी मात्र गेले.
आणि याच्या अगदी उलट घडलेलं ११ सप्टेंबर १८९३ ला. जागतिक सर्वधर्म सभेत पौर्वात्याचा ज्ञानसूर्य अमेरिकेच्या आकाशात तळपला असा की त्याने सर्वांना प्रेमाची ज्ञानाची तपश्चर्येची आपलेपणाची ऊब दिली. परदेशातील सर्व जनांना आपले बंधू आणि भगिनी म्हणून संबोधलं आणि त्यांच्यासोबत प्रेमाचं नात जोडलं. पश्चिमात्यांच्या मनांत हिंदू धर्म हिंदू भूमी विषयी असणाऱ्या खुळ्या कल्पना दूर करून सत्याचा प्रकाश त्यांच्यापर्यंत पोहचवला. अभिमानाने आणि ताठ मानेने आपल्या धर्माची तत्वे सादर केली आणि साऱ्या जगाला आपलेसे केले ते स्वामी विवेकानंदांनी!
मला वैयक्तिक कोणालाच कोणत्याच धर्माला दोष द्यायचा नाही. पण मी हिंदू धर्मात जन्म घेतला हे मी माझे सौभाग्य समजते. माझा धर्म कोणावरही अन्याय, अत्याचार करायची मला सूचना देत नाही की परवानगी ही देत नाही. सर्वांचे कल्याण होवो, सर्वांना निरामय आरोग्य लाभो असं शिकवणार माझा हिंदू धर्म, ज्याची विजयपताका त्रिखंडात मिरवणाऱ्या स्वामी विवेकानंदांचा मला सार्थ आदर वाटतो. त्या महान तपासव्याने जे काही केले, सांगितले त्याचे आकलन होणे आणि त्याच्याच पाऊलवाटेने चालणे हे योग्यच वाटू लागते.
आजच्या या दिनी या दोन्ही प्रसंगाचे स्मरण होते आणि मग आपण स्वतःलाच प्रश्न करतो मी काय व्हावं? कशाप्रकारे साऱ्या जगाला कवेत घ्यावं? निश्चितच प्रेमाने! दहशतीचे नाहीच नाही! स्वामीजींनी आपल्या धर्माला मिळवून दिलेल्या मानसन्मानाला कोठेही कमीपणा येणार नाही, झाली तर त्यात वृद्धीच होईल असा निर्धार करून आजच्या या विश्वबंधुत्व दिनानिमित्त एक पाऊल पुढे टाकू! या सारे मिळून या विश्वाला आपलेसे करूया!
©उमा जोशी ११/०९/२०१९
PC: Google.
मित्रांनो आज ११ सप्टेंबर. हा दिनांक आणि अमेरिका यांचं एक पक्के नातं आहे. दोन वेगवेगळ्या कारणांनी या दिवशी पूर्ण अमेरिकाच काय पण सारं जगच हादरलं होतं. फक्त एक धक्का सुखद होता तर दुसरा दुःखद. एकाने सर्वांना एकत्र येण्यासाठी साद घातली तर दुसऱ्याने दहशत पसरवली. एकाने सर्वांना प्रेमाने ज्ञानाने आपलेसे केले तर दुसऱ्याने मात्र सगळ्यांना सळो की पळो करून सोडले.
अगदी अचूक ओळखलंत सगळ्यांनी. ११ सप्टेंबर २००१ या रोजी ओसामा बिन लादेनच्या अल कायदा या दहशतवादी संघटनेने अमेरिकेच्या संरक्षण क्षेत्राशी निगडित अशा पेंटागॉन तसच वर्ल्ड ट्रेड सेंटर या इमारतींवर विमाने वापरून हल्ला केला. अपरिमित वित्त व जीवित हानी झाली आणि साध्य काय झालं तर काहीच नाही. स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्याचा हव्यासापोटी निरपराध जीवांचे बळी मात्र गेले.
आणि याच्या अगदी उलट घडलेलं ११ सप्टेंबर १८९३ ला. जागतिक सर्वधर्म सभेत पौर्वात्याचा ज्ञानसूर्य अमेरिकेच्या आकाशात तळपला असा की त्याने सर्वांना प्रेमाची ज्ञानाची तपश्चर्येची आपलेपणाची ऊब दिली. परदेशातील सर्व जनांना आपले बंधू आणि भगिनी म्हणून संबोधलं आणि त्यांच्यासोबत प्रेमाचं नात जोडलं. पश्चिमात्यांच्या मनांत हिंदू धर्म हिंदू भूमी विषयी असणाऱ्या खुळ्या कल्पना दूर करून सत्याचा प्रकाश त्यांच्यापर्यंत पोहचवला. अभिमानाने आणि ताठ मानेने आपल्या धर्माची तत्वे सादर केली आणि साऱ्या जगाला आपलेसे केले ते स्वामी विवेकानंदांनी!
मला वैयक्तिक कोणालाच कोणत्याच धर्माला दोष द्यायचा नाही. पण मी हिंदू धर्मात जन्म घेतला हे मी माझे सौभाग्य समजते. माझा धर्म कोणावरही अन्याय, अत्याचार करायची मला सूचना देत नाही की परवानगी ही देत नाही. सर्वांचे कल्याण होवो, सर्वांना निरामय आरोग्य लाभो असं शिकवणार माझा हिंदू धर्म, ज्याची विजयपताका त्रिखंडात मिरवणाऱ्या स्वामी विवेकानंदांचा मला सार्थ आदर वाटतो. त्या महान तपासव्याने जे काही केले, सांगितले त्याचे आकलन होणे आणि त्याच्याच पाऊलवाटेने चालणे हे योग्यच वाटू लागते.
आजच्या या दिनी या दोन्ही प्रसंगाचे स्मरण होते आणि मग आपण स्वतःलाच प्रश्न करतो मी काय व्हावं? कशाप्रकारे साऱ्या जगाला कवेत घ्यावं? निश्चितच प्रेमाने! दहशतीचे नाहीच नाही! स्वामीजींनी आपल्या धर्माला मिळवून दिलेल्या मानसन्मानाला कोठेही कमीपणा येणार नाही, झाली तर त्यात वृद्धीच होईल असा निर्धार करून आजच्या या विश्वबंधुत्व दिनानिमित्त एक पाऊल पुढे टाकू! या सारे मिळून या विश्वाला आपलेसे करूया!
©उमा जोशी ११/०९/२०१९
PC: Google.


खूप छान लिहितेस उमा.
ReplyDeleteस्वामी विवेकानंद यांच्या बद्दल कॉलेज ला असताना वाचलं होतं. त्यांचे कार्य, विचार याने मन भारून गेले.
धन्यवाद🙏
Deleteखुप छान विचार मांडले आहेस.
ReplyDeleteधन्यवाद 🙏
DeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Delete